Thursday, April 23, 2020

लॉकडाऊन १ मधील ग्रामीण भारतातील जनजीवन
                                                          कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने 22 तारखेला एक दिवसाचा जनता कर्फ्यू घोषित केला आणि त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन व कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या इतर देशाच्या परिस्थितीचा विचार करता भारत सरकारने 24 मार्च 2020 ला 21 दिवसाच्या पहिला लॉकडाऊन जाहीर केला. या लॉकडाऊन चा सकारात्मक परिणाम म्हणून आपल्या देशामध्ये कोरोनाला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत झाली. या 21 दिवसाच्या लॉकडाऊन चा देशातील  ग्रामीण भागातील जनतेवर कसा परिणाम झाला आहे हे पाहण्यासाठी संशोधकाने गुगल फॉर्म च्या माध्यमातून एक प्रश्नावली तयार केली व  ती व्हाट्सअप, ई-मेल व फेसबूक च्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना वितरित करण्यात आली. या प्रश्नावलीच्या माध्यमातून 110 प्रतिसाद मिळाले. त्यामध्ये 45 पुरुष 65 महिला यांनी आपला प्रतिसाद नोंदविला. त्यामध्ये 20 वर्ष आलेल्या 48 मुला-मुलींनी, 21 ते 30 वय असलेल्या 27, 31 ते 40 वय असलेल्या 28 लोकांनी तसेच 41 पासून पुढे वय असलेल्या 7 लोकांनी आपला प्रतिसाद नोंदविला. आपणास 21 दिवसांच्या लॉकडाऊन मध्ये ग्रामीण भागातील जनता कशा पद्धतीने कोरोना ला सामोरी गेली हे लक्षात येईल. संशोधकाने अनेक प्रश्न त्यांना विचारले त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न  व  त्यांनी दिलेले  प्रतिसाद पुढील प्रमाणे.
प्रश्न क्र. 1. तुमचा पेशा काय?
    उत्तर: यामध्ये जवळ जवळ 59 विद्यार्थी, 14 नोकरदार, 24 शेतकरी, 6 गृहिणी, 7 व्यवसायिक असे एकूण 110 लोकांनी प्रतिसाद नोंदवला.
प्रश्न क्र. 2. तुमच्या घरात किती सदस्य आहेत?
    उत्तर: घरामध्ये 2 सदस्य आहेत अशी 6, 3 सदस्य आहेत अशी 10, 4 सदस्य आहेत अशी 37, 5 सदस्य आहे अशी 19,  5 सदस्यांत पेक्षा जास्त सदस्य अशी 38 एकूण 110 कुटुंबांनी आपला प्रतिसाद नोंदविला आहे. या वरून असे दिसते की ग्रामीण भागात ४ पेक्षा जास्त सदस्य असलेली कुटुंबे जास्त आहेत.
प्रश्न क्र. 3. कोरोना विषयी आपणास माहिती कोठून मिळाली?
   उत्तर: वर्तमान पत्र व त्यांच्या ॲप च्या माध्यमातून 20, टीव्ही न्यूज चैनल च्या माध्यमातून 61, सोशल मीडियाच्या माध्यमातून 19, तर सरकारी  GR माध्यमातून  5, व मित्र व नातेवाईकांच्या माध्यमातून 5 लोकांना कोरणा विषयी प्राथमिक माहिती मिळाली. या वरुन असे दिसते की टी.व्ही. व इतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून कोरोना विषयी माहिती मालत आहे.
प्रश्न क्र. 4. कोरोना च्या यासंदर्भात तुमचे कुटुंब योग्य ते काळजी घेत आहे का?
   उत्तर: 100% होय. ग्रामीण भागातील जनता सुद्धा कोरोनाच्या बाबतीत योग्य ती दक्षता घेत आहे.
प्रश्न क्र. 5. 22 मार्च रोजी च्या जनता कर्फ्यू चे कडक पालन केले का?
   उत्तर: 100% होय. देशामध्ये २२ मार्च ला जो जनता कर्फ्यू घोषित केला त्याचे ग्रामीण भागामध्ये सुद्धा काटेकोर पाने पालन झाले होते.
प्रश्न क्र. 6. सरकारने घोषित केलेल्या 21 दिवसाच्या लॉकडाउन बद्दल तुम्ही समाधानी आहात ?
   उत्तर: 21 दिवसाच्या लॉकडाउन बद्दल ग्रामीण भागातील फक्त 17% लोक असमाधानी तर   83% जनता समाधानी आहे.
प्रश्न क्र. 7. 21 दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये आपण काय केले?
   उत्तर: यामध्ये 27% प्रतिसाद देणार्‍यांनी अभ्यासाबरोबरच, घराच्या कामात मदत करणे, टीव्ही पाहणे याला प्राधान्य दिले तर, 64 % लोकांनी शेतामध्ये काम करण्यावर भर दिला व त्याबरोबर जनावरांना चारा व त्यांची निगा राखणे तसेच इतर कामात मदत करणे. तसेच 9% लोकांनी टीव्ही पाहणे व मोबाईलचा वापर करण्यावर प्राधान्यक्रम दिला. म्हणजेच ग्रामीण भागातील जनतेने शेतातील कामे करण्यावर भर दिल्याचे दिसते. त्याबरोबरच जे विद्यार्थी आहेत ते सध्या काही प्रमाणात अभ्यास
प्रश्न क्र. 8. 21 दिवसांमध्ये काही अडचणी आल्या का?
    उत्तर: 84%  लोकांना अडचणी आल्या तर 16 % लोकांना कोणत्याही अडचणी आल्या नाहीत. यावरून आपणास असे दिसते की ग्रामीण भागातील जनतेला मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागले आहे.
प्रश्न क्र. 9. लॉक डाऊन च्या काळात काही पुस्तके वाचली का?
   उत्तर: 51% लोकांनी पुस्तके वाचली नाहीत व 49% लोकांनी पुस्तकांचे वाचन केले त्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी आहेत. विद्यापीठीय परीक्षा संदर्भात अध्याप कोणताही निर्णय झालेला नसल्यामुळे त्यांनी आपला काही प्रमाणात अभ्यास सुरु ठेवला आहे मात्र त्यांचे असेही म्हनणे आहे की त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही.
प्रश्न क्र. 10. तुमच्या कुटुंबास वित्तीय अडचण आली का?
   उत्तर: 57% लोकांना अडचण आली नाही मात्र 43 % लोकांना वित्तीय अडचणींना सामोरे जावे लागले आहे. या वरून असे दिसते की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने केलेल्या मदतीचा लाभ ग्रामीण जनेतला झाला आहे मात्र काही प्रमाणात लोकांना वित्तीय अडचनींना सामोरे जावे लागले आहे.
प्रश्न क्र. 11. तुमच्या गावात भीतीचे वातावरण आहे का?
उत्तर: 98% लोकांच्या मते त्यांच्या गावामध्ये भीतीचे वातावरण आहे तर  8% च लोकांना वाटते की त्यांच्या गावात भीतीचे वातावरण नाही.
प्रश्न क्र. 12. तुमच्या घरातील सदस्यांची मानसिक स्थिती स्थिर आहे का?
उत्तर: 76% लोकांच्या मते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची मानसिक स्थिती स्थिर आहे व 24% लोकांच्या मते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची मानसिक स्थिती स्थिर नाही.
प्रश्न क्र. 13. तुमच्या कुटुंबाला राशन समस्या होती का?
उत्तर: 79%  लोकांच्या कुटुंबाला राशन ची समस्या भेडसावली नाही व 21% लोकांना मात्र राशनच्या समस्येला तोंड द्यावे लागले. या वरून असे दिसते की केंद्र व राज्य सरकारने केलेल्या उपयोजनांची ग्रामीण भागात त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे.
प्रश्न क्र. 14. केंद्र व राज्य सरकारने केलेल्या धोरणांबाबत आपण खुश आहात का?
     उत्तर: 98% लोक केंद्र व राज्य सरकारच्या योजना व अंमलबजावणी वरती खूष आहेत. फक्त 2% टक्के च लोक नाखूष आहेत.
प्रश्न क्र. 15. लॉकडाऊन च्या काळात आपण इतर कोणाला मदत केली का?
     उत्तर: 67% लोकांनी लॉकडाउन च्या काळात इतरांना मदत केली व 33% लोकांनी कोणत्याही स्वरुपातील मदत केलेली नाही. यातून ग्रामीण भागातील जनतेमध्ये इतरांना मदत करण्याची जी आत्मीयता असते ते दिसून येते.
प्रश्न क्र. 16. तुम्ही 21 दिवसांमध्ये योगा केला आहे का?
     उत्तर: 37%  लोकांचे म्हणणे आहे की त्यांनी योगा केला व 63% लोकांचे म्हणणे आहे की त्यांनी अजिबातच योगा केलेला नाही. मोजकेच लोक योगा आणि व्यायाम करतात असे या वरून आपणास दिसते.
प्रश्न क्र. 17. तुम्ही दूरदर्शन वरील रामायण मालिका पाहता का?
उत्तर:  75% लोकांच्या मते रामायण मालिका ते नियमित पाहतात  मात्र 25% लोक रामायण मालिका पाहत नाहीत. 90 च्या दशकामद्ये आणि जेव्हा प्रथमच कलर टी.व्ही. भारतात सुरु झाला होता. मात्र त्या काळी टी.व्ही. सेट फार कमी लोकांकडे असायचा, रामायण पाहायला मिळायचे नाही, रामायण हि मालिका त्याकाळी सर्वात लोकप्रिय होती. दूरदर्शन ने या लॉकडाउन च्या काळात त्याचे पुनः प्रसारण करून ग्रामीण भागातील लोकांचे मनोरंजन केले आहे.
प्रश्न क्र. 18. तुम्ही डीडी भारती वरील महाभारत मालिका पाहता  का?
      उत्तर: 62% लोक महाभारत पाहतात व 38% लोक महाभारत पाहत नाहीत. महाभारत हि मालिका सुद्धा 90 च्या दशकातील आहे, हि मालिका सुद्धा तितकीच लोकप्रिय होती. त्याचे हि या लॉकडाउन च्या काळात पुनः प्रसारण केल्यामुळे लोकांचा चांगलाच विरंगुळा व वेळ व्यथित झाला.
प्रश्न क्र. 19. लॉकडाउन बाबतीत तुमचे मत काय?
उत्तर:  लोकांनी आपली मनोगते मांडली ती पुढील प्रमाणे - घरात राहणे व  सुरक्षित असणे त्याबरोबरच आपले छंद जोपासावे, सरकारने घेतलेला निर्णय हा अतिशय महत्त्वाचा असून लोकांनी घरांमध्येच राहून सहकार्य करावे तसेच डॉक्टर नर्स यांचे धन्यवाद, काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे हेच सध्या च्या परिस्थितीमध्ये महत्त्वाचे आहे, सर्वांसाठी लॉक डाऊन हा अतिशय महत्त्वाचा आहे, सरकारचा हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे, लॉक डाउन केल्यामुळे आम्ही समाधानी आहोत, यामधून एक सकारात्मक मिळाले की मानवाला जास्त कशाची गरज नसे त्याने कुटुंबास वेळ घालवणे हे गरजेचे असते,  लॉकडाऊन हा देशासाठी महत्त्वाचा असून आपण सर्वांनी त्याचे पालन करणे गरजेचे आहे, ग्रामीण भागामध्ये लॉकडाउन हा काही प्रमाणामध्ये स्थितीतील करण्यात यावा, सरकारने शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर केल्याबद्दल सरकारचे धन्यवाद, विद्यार्थ्यांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा व व्यापाऱ्यांनी त्यांचे शोषण करणे थांबवले पाहिजे. शासनाने विद्यार्थ्यांच्या परीक्षा संदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा. काहींचे असे म्हणणे आहे की जोपर्यंत कोरोना पूर्णपणे हद्दपार होत नाही तो पर्यंत लॉकडाऊन सुरूच ठेवावा. एकूण परिस्थितीचा विचार करता जेथे कोरोरणाचा प्रादुर्भाव कमी आहे तेथे लॉकडाऊन शिथिल करण्यात यावा.


20. समारोप: -
       देशाच्या ग्रामीण भागामध्ये जरी कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव नसला तरी ग्रामीण जनतेमध्ये कोरोनाविषयी भीती आहे. सध्या ग्रामीण भागातील लोक शेतामध्ये करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामध्ये पाळीव प्राण्यांची निगा राखन्याबारोबरच त्यांची काळजी घेण्यावर भर आहेत्याबरोबरच टी.व्ही. पाहणे, मोबाईल चा वापर करणे, रेडीओ ऐकणे, मित्र व नातेवाईकांना फोन करणे, शेजार्यांशी चांगले संबध प्रस्थापित करणे, एकमेकांना सहकार्य करणे इत्यादी गोष्टीवर भर देत आहेत. शाळकरी मुला मुलींमध्ये हि भितिचे वातावरण असल्याने त्यांचे अभ्यासात मन लागत नाही ते सुद्धा शेतीच्या कामात हातभार लावत आहेत. ग्रामीण भागामध्ये सुद्धा जनतेला वित्तीय तसेच राशन च्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेती माल मागणी व वाहतुकीच्या व्यवस्थे अभावी मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. त्यामध्ये द्राक्ष, केली, गोबी-फ्लॉवर, टोम्याटो, गवार, वांगी, भेंडी, कलिंगड, टरबूज, कारले-दोडके, मिरची, पाले भाज्या, आणि इतर पिके घेणाऱ्या शेतार्यांचे मोठे नुकसान झाले आहे. केंद्र शासनाने शेतकरी योजनेंतर्गत रुपये 2000 हजार दिले असले तरी ते एकूण नुकसानीचा विचार करता खूपच कमी आहेत, मात्र शेतकरी मात्र सध्या सरकारच्या बाबतीत समाधानी आहेत व त्यांना एक अशा आहे की सरकार लावारच नवीन कर्जपुरवठा करेल. सध्या ग्रामीण भागातील जनता सुद्धा रामायण व महाभारत सारख्या मालिका मोठ्या प्रमाणावर पाहून आपला वेळा घालवत आहेत. देशाचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे येणाऱ्या कालावधी मध्ये ग्रामीण जनतेचे हित डोळ्यासमोर ठेऊन काही सकारात्मक निर्णय घेतील. सध्या आपण सर्वजण सरकारच्या आदेशांच व सूचनांच पालन करूया.
घरातच राहूया आणि कोरोनाला हारउया.!!
शेती व्यवस्था आहे म्हणून शेतकरी आहे.
शेतकरी आहे म्हणून शेतमाल पिकत आहे.
शेतमाल पिकत आहे म्हणून जीवन आहे.
जीवन आहे म्हणून मानवव्यवस्था आहे.
मानवव्यवस्था आहे म्हणून व्यवसाय आहे.
व्यवसाय आहे म्हणून उद्योग-धंदा आहे.
उद्योग आहे म्हणून रोजगार व अर्थकारण आहे.
अर्थकारण आहे म्हणून देशाची अर्थव्यवस्था आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार करायचा असेल तर जो शेती हा या सर्वांचा मूळ पाया आहे त्यालाच प्राधान्याने मजबूत केले पाहिजे.
लेखक:
श्री. एन. डी. बनसोडे
सहाय्यक प्राध्यापक,
सद्गुरु गाडगे महराज कॉलेज, कराड
९८९०५३३२७६
ईमेल: nbanasode@gmail.com

No comments:

Post a Comment

लॉकडाऊन १ मधील ग्रामीण भारतातील जनजीवन                                                           कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने 22 ...